शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

परीक्षार्थ्यांकडून ‘भारताचे संविधान’ला सर्वाधिक मागणी वाचकांचीही पसंती : शासकीय मुद्रणालयात सातवी आवृत्ती उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:10 IST

कोल्हापूर : भारतीय राज्यघटना अर्थात ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला आजही वाचकांची पसंती आहे. भारतीय लोकशाहीचा मूलाधार असलेले हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध

कोल्हापूर : भारतीय राज्यघटना अर्थात ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला आजही वाचकांची पसंती आहे. भारतीय लोकशाहीचा मूलाधार असलेले हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षार्थ्यांकडून त्याला सर्वाधिक मागणी आहे.

राज्यघटनेच्या तरतुदींनुसार येथील लोकशाही, राज्यव्यवस्था, धर्मनिरपेक्षता जपली जाते. राज्यघटनेचे लेखन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण झाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने तिचा स्वीकार केला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक केवळ मराठीत होते. मात्र, अभ्यासकांसह बºयाच परभाषिक नागरिकांना ते समजून घेण्यात अडचणी येत होत्या.

वाचकांच्या मागणीमुळे २०१४ साली या पुस्तकाची इंग्रजी आणि मराठी अशी द्विभाषी आवृत्ती भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी तयार केली आहे. संवैधानिक जनादेशाची पूर्तता व्हावी, जनतेला या देशातील कायद्यांची माहिती व्हावी, त्यांना त्यांच्या प्रादेशिक राजभाषेमध्ये ते समजून घेता यावेत, हा यामागील उद्देश होता. या आवृत्तीत संविधानातील (अठ्ठ्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २०१२ यांच्या तरतुदीसह सर्व सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकांचा १५ आॅगस्ट, २६ जानेवारीच्या दरम्यान सर्वाधिक खप होतो. भेट म्हणून देण्यासाठीही त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

हे पुस्तक ४१७ रुपयांना असून, २०१४ सालापासून आजतागायत अंदाजे १३०० च्या आसपास पुस्तकांची विक्री ताराबाई पार्क येथील शासकीय मुद्रणालयातून करण्यात आली आहे. या पुस्तकाची छपाई केंद्र शासनाच्यावतीने केली जात असल्याने विक्रीतून मिळालेली रक्कमही केंद्राकडे जमा केली जाते. ‘भारताचे संविधान’सह साहित्य संस्कृती मंडळ, दर्शनिका विभाग, भाषा संचालनालय आणि शासनाचे सर्व अधिनियम (जीआर) यांची छपाई शासकीय मुद्रणालयातून केली जाते.बदलानुसार सुधारित आवृत्ती‘भारताचे संविधान’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७९ साली निघाली. दुसरी १९८३, तिसरी १९८८, चौथी १९९२, १९९६, पाचवी २००२, सहावी २००६, २०११ आणि २०१२ साली; तर सातवी आवृत्ती २०१४ साली काढण्यात आली आहे. राज्यघटना लिहिली गेली त्यावेळी देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थिती वेगळी होती. त्यानंतर समाजव्यवस्थेत कालानुरूप बदल होत गेले. या बदलांसाठी म्हणून राज्यघटनेतील विविध कलमांमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तरतुदी बदलत गेल्या, कायद्यांमध्ये बदल सुचविले गेले. आजतागायत ही बदलांची प्रक्रिया सुरूच आहे. त्या बदलांनुसार पुस्तकाच्या आवृत्त्या काढल्या आहेत. 

‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांतील नागरिकांकडून मोठी मागणी आहे. इंग्रजी आणि मराठीमध्ये हे पुस्तक असल्याने ते समजून घेण्यासाठी अधिक सोपे आहे. मागणीनुसार पुस्तकाची छपाई केली जाते. याशिवाय बाबासाहेब आंबेडकर व शाहू गौरवग्रंथ या पुस्तकांची अधिक विक्री होते.- संजय वायचळ, व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय